भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत ठराव संमत मुंबई, ता. ११ : मतदारांच्या प्रश्नांना उत्तर…
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जे फोटो…
भारतीय कम्युनिस्ट पक्ष पर्यायी कार्यक्रम सुचवत आहे, जो डाव्या लोकशाही आघाडीच्या माध्यमातून दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता आणि रोगराई असे मूलभूत प्रश्न हाताळेल. याचा अर्थ सध्या फक्त किमान कार्यक्रम अंमलात आणायचा नाही तर त्यापलीकडे जाऊन आणखी प्रगतीकारण धोरणे व कार्ये हाती घ्यायची आहेत. फक्त कामगार, शेतकरी, शेतमजूर, इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञ, युवक आणि विद्यार्थी, महिला, शिक्षक आणि व्यावसायिक जनसमूह या संघटनांच्या जनआंदोलनातून हे वळण घेणे शक्य आहे. हे संघर्ष वैचारिक-राजकीय मोहिमेच्या मार्गाने राजकीय स्तरावर उंचावले पाहिजेत. वर्गीय शक्ती संतुलनात बदल घडविण्याचे उद्दिष्ट ठेऊन बदलाचे व परिवर्तनाचे हे रणमैदान असेल. श्रमजीवी जनतेची मोहिम, चळवळ व संघर्ष ही पर्यायी मार्ग पुढे नेण्याची गुरूकिल्ली आहे.